Sunday, September 6, 2015

"लाईफ-पार्टनर" शोधण्याची जबाबदारी कुणाची?

जरासा वेळ काढून आपल्या आई-वडिलांच्या संसाराकडे बघा; त्यांनी एकमेकांना साथ देऊन/हातात हात घेऊन तुमचं जे एक गोड घरटं उभं  केलं आहे त्याकडे जरा गंभीरपणे बघा. आता जरा पुढे बघा, तुम्हाला तुमच्या जोडीदाराला घेऊन  सेम असंच घरटं उभारायचं आहे? तुम्हालाही असेच प्रेमळ आई-बाबा होऊन तुमच्या चिमुकल्याचा चिवचिवाट बघायचा आहे? आज तुमच्या आई-वडिलांच्या कुंटुंबाची प्रतिकृती निर्माण करायची आहे?


 ह्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर "हो" असतानाही तुम्ही स्वतःच्याच लग्नाबाबत, जोडीदाराच्या शोधाबाबत इतके उदासीन आहात? आपलं लग्न, आपला जोडीदार, आयुष्यात अति-महत्त्वाचं स्थान असलेलं आणि अगदी हक्काचं "आपलं माणूस" कधी निवडणार आहात?


आज फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्स-अप, विकिपीडिया हे सर्व सहज वापरणा-या, नव्हे ह्याच्याशिवाय जगू न शकणा-या तरुणाईची स्वतःच्या लाईफ पार्टनर शोधण्याविषयीची अनास्था पाहून कधी चिंतीत तर कधी चकित व्हायला होतं. आम्ही सतत विवाहेच्छुक वधू-वरांशी, त्यांच्या पालकांशी बोलत असतो. त्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि "पालकांनी शोधलेल्या" स्थळांपैकी, पुढे जाण्यासाठी मला कोणते स्थळ योग्य वाटते इतके सांगितले की संपले...मुलं निवांत आणि पालक कामाला. 



मला सांगा आज दर दहा तरुणांपैकी किती जण स्वतः विचार करून ठरवतात की होय आता माझ्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर लग्न करण्याची वेळ आली आहे (नाही ते ठरवणे पालकांचे काम आहे....आणि संसार मात्र तुमचा); त्यासाठी मी स्वतः योग्य त्या विवाहसंस्था शोधेन, तिथे नावनोंदणी करेन, मला हवा तसा जोडीदार शोधण्यासाठी प्रयत्न करेन, योग्य त्या संभाव्य जोडीदाराशी फोनवर, तर कधी प्रत्यक्ष भेटून बोलेन, चर्चा करेन, गरज भासल्यास आपलं माणूस विवाहसंस्थेसारख्या विचारी, मार्गदर्शक संस्थेची मोफत मदत घेईन....खरच होतंय का असं? दर दहा पैकी किती विवाहेच्छुक असं करतात?





माझ्या संसाराची तयारी, निर्णय घेण्याचे काम, ही सर्व तर "घरच्यांची" जबाबदारी आहे. मग लग्नानंतर १-२ वर्षे पालक लक्ष देतील....पुढे? जोडीदारासोबत उर्वरित साधारण ५० वर्षांचा काळ मला निभवायचा आहे. माझ्या, माझ्या संसाराच्या, माझ्या अपत्यांच्या समस्यांना मला & माझ्या जीवनसाथीला मिळून समोरं जायचं आहे. 
 
आपल्याला फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्स-अप, विकिपीडिया हे वापरता येतं, त्याचा सुयोग्य वापर करता येतो, पण हा अतिशय साधा विचार मात्र करता येऊ शकतो. मग कधी होणार आहात सिरीयस? कधी घेणार आहात सूत्र स्वतःच्या हातात स्वतःच्याच आयुष्याची? न लाजता, न डगमगता? कारण हीच तर योग्य वेळ आहे आयुष्याचं नीट प्लॅनिंग करण्याची. नाहीतर पश्चात्ताप, मनस्ताप, वाद-विवाद, इ. हे तर अन्यथा आहेच. आपण हे सर्व खात्रीने, निश्चितपणे टाळू शकतो. आपण कुठल्याही स्थळाला 'होकार' कळविण्यापूर्वी आमच्या ब्लॉगवरील 'मुलींनी लग्न ठरविण्यापूर्वी ही काळजी घ्यावी' आणि 'सुयोग्य जोडीदार म्हणजे नेमकं काय?' हे दोन लेख वाचावेत. आपण आवश्यकता वाटल्यास आपण आमच्या खाली दिलेल्या ग्राहक सेवा क्रमांकावर एक फोनकरून चर्चा करू शकता. हे मार्गदर्शन सर्वांसाठी मोफत आहे.

खरंच पटतंय? सिरियस आहात ह्याबाबत? विचारी आहात? मग थांबू नकाच.


आपलं माणूस विवाहसंस्था आपल्या त्वरित शुभ-विवाहाची आणि सुखद सह-जीवनाची कामना करते.



सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी....
आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com



ग्राहक सेवा क्रमांक:  98-606-82-967 आणि 738-7171-483
वेळ: स. 10 ते सायं 6 | रविवार सुरु



आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/ 

फेसबुक पेज लाईक करा : 
https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha 

गुगल ग्रुप जॉईन करा :
 
https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus



No comments:

Post a Comment